Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Mumbai Rain Waterlogging)
मुंबई : मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Mumbai Rain Waterlogging)
“मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (5 ऑगस्ट) मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.”
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
“कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
0 Comments